एक सर्वांग सुंदर अनुभव......!
कवितेला कधी जाऊ दे म्हणायचं नसतं हे एकदम पटलं !
माझ्या शब्दात.....👇
कवितेला कधी जाऊ दे म्हणायचं नसतं.....!
आकाश गडगडतं, आणि काळे ढग साचतात..... तेव्हा मनाचं कवाड बंद करायचं नसतं,
शब्दांच्या वर्षावात मनसोक्त न्हावून घ्यायचं असतं
कवितेला कधी जाऊ दे म्हणायचं नसतं.....!
चाफ्याचं झाड जेव्हा स्वप्नात येतं, तेव्हा
ओंजळ फुलांनी भरून घ्यायची असते.
कवितेचा आनंद आणि सुगंध पसरवायचा.
कैवल्याच्या चांदण्यांचं लेणं अंगभर मिरवायचं,
कवितेला कधी जाऊ दे म्हणायचं नसतं.....!
आठवणींवर साठवलेली धूळ झटकायची,
कवितेचा शोध चालूच ठेवायचा !
कवितेचं देणं आणि घेणं लुप्त होऊ द्यायचं नसतं.
कवितेला कधी जाऊ दे म्हणायचं नसतं.....!
✍️ सुजाता