अजून हवं अजून हवं, हांव काही संपत नाही.
हवं ते मिळालं, तर कधी संपेल, समजत नाही,
कितीही जपून ठेवलं, तरी भय काही सरत नाही.
क्रोध जाता जात नाही, मत्सर कमी होत नाही,
कित्ती विचार केला तरी विवेक काही येत नाही.
मनाला दाबून ठेवलं तरी उसळी मारतच राही,
कंट्रोल केलं, तरी आवाक्यात रहात नाही !
काय केलं, तर वासना संपतील,
काही केल्या उमगत नाही.....
मनःशांती कशी मिळेल, हे काही कळत नाही !
अंतरात्म्यास विचारून पाही,
तूच उपाय सुचव काही.....
भक्तिमार्गावर पाऊल ठेवता, कोलाहल शांत होई
"करविता" कळताच, "कर्ता भाव" गळत जाई..
'मी' 'मी' चे तुणतुणे आता फारसे वाजत नाही,
उमगते आपल्याला, आपण तर पालखीचे भोई,
आपण तर पालखीचे भोई .....!!
✍️ सुजाता

No comments:
Post a Comment