अमृता प्रीतम चं "मृत्यूपत्र" !
अगदी पूर्णपणे भानावर राहून,
निरोगी मन:स्थितीत,
मी माझं मृत्यूपत्र लिहितेय....
माझ्या मृत्युनंतर, माझ्या घरावर धाड घाला, अगदी उलथापालथ करून, माझं घर पिंजून काढा.....
इतस्ततः विखुरलेली माझी सारी स्वप्न,
अशा स्त्रियांना देऊन टाका,
ज्या फक्त "चूल आणि मूल" यांतच अडकल्या आहेत,
जणू त्यांना दुसरं जगच उरलेलं नाही,
स्वप्न बघणं सुद्धा त्या विसरल्या आहेत.
माझं "हसू" वृद्धाश्रमांवर पसरवा,....
ज्यांची मुलं अमेरिकेसारख्या संपन्न शहरांमध्ये हरवली आहेत ....!
माझ्या टेबलावर काही रंग पडलेत,
त्यांनी रंगू द्या अश्या साड्या,
भिजल्यात ज्यांच्या कडा
त्यांच्या पतीच्या - तिरंग्यात गुंडाळून आलेल्या शवाच्या रक्तामध्ये !
माझे अश्रू, त्या कवींना द्या,
जे प्रसवतील "कविता" प्रत्येक थेंबातून,
मला खात्री आहे.....!
माझा 'मान- सन्मान' त्या 'वेश्यांना' द्या,
ज्या, आपल्या मुलींना शिक्षण मिळावं, म्हणून, आपला देह विकतात....!
या देशातल्या प्रत्येक तरूणाला पकडून
त्यांच्या नसानसात माझा राग, संताप मिसळू द्या,
राज्यक्रांती साठी त्यांना गरज भासेल.
माझा परमानंद त्या संतांसाठी आहे,
जे सर्वसंग परित्याग करून,
ईश्वराच्या शोधात निघाले आहेत.....
आणि शेवटी, जे काही उरेल,
माझी लालसा,
हांव, लोभ,
मत्सर, राग, द्वेष,
खोटेपणा, स्वार्थ,
हे सारं, माझ्याबरोबरच जाळून टाका !
(रूपांतर ✍️ सुजाता)