रणरणत्या ग्रीष्मा नंतर सुरूझाली पानगळ
गळून पडले माझ्या लाडक्या झाडाचे
पान न् पान .....!
मिठी मारून म्हटले, मी माझ्या झाडाला,
नको दुःख करू, मी आहे ना तुला .....
झाड हळूच हसले, भास झाला मला, दुसऱ्या दिवशी येऊन बघते तर
सुंदर नाजूक कोंब....
फुटली नाजूक पालवी झाडाला....!
झाडाने माझीच समजूत घातली,
काळजी करू नकोस, मुली....
गर्द काळोख्या रात्रीनंतर पहाट होते, पानगळीनंतर पालवी फुटते,....
हेच तर आयुष्याचे चक्र असते,
हेच तर आयुष्याचे चक्र असते....!!
✍️ सुजाता.

No comments:
Post a Comment