अरे पिकल्या पाना,....
गळून पडणार म्हणून
का उगां खंतावतोस मनां ?
कधीकाळी नाजूक कोंब बनून,
तू वटवृक्षाची सुरूवात केलीस,
हिरवं गार पान बनून वाटसरूला
तुझयापरीने सावली दिलीस.
बहरानंतर पानगळ येणार,
हा ऋतुचक्राचा नियम असतो,
परिपक्वपणे गळून जायला,
मग तू का एवढा विरोध करतो ?
कदाचित गाणाऱ्या वाऱ्यासंगे
तू तरंगत जाशील....
कदाचित पाण्यावर पडून एखाद्या
मुंगीचा जीव वाचवशील....
रंगीत फुलांबरोबर कदाचित
गुच्छामध्ये गुंफला जाशील.
किंवा 'पत्री' बनून देवाच्या
चरणांवर वाहिला जाशील....
एखादा रसिक, वहीत ठेवून
तुला जाळीदार बनवेल,.....
कशावरून, गळून पडल्यावर
आयुष्य तुझं उजाड बनेल ?
झाडाचा Comfort Zone सोडण्यातच
आहे तुझं भलं, खरं !
आणि हे तुला, लवकरात लवकर
उमगलं, तर बरं !!
✍️ सुजाता 🍂

No comments:
Post a Comment