कर्मयोग भासे कठीण.....
कसे करावे प्रत्येक कर्म, ईश्वरार्पण...?
प्रत्येक कर्म करताना चिंता काळजी न वाटणे ही एक खूण.
जळी स्थळी सर्व काळी परमेश्वर करतो रक्षण,
कर्मफलदाता ईश्वरच आहे हे पक्के जाण.
भरवसा ठेवता देवावर, येते निर्धास्तपण.
भूतकाळाची आठवण,भविषयाचे चिंतन हेंच दुःखाचे खरे कारण ॥
करता नामाचे अखंड स्मरण,
भक्तिमार्ग आचरावा आपण !
भक्तिमार्गाचे करता अनुसरण,
होईल शुद्ध, अंतःकरण...
आणि स्व- स्वरूपाची येईल जाण !!
✍️ सुजाता

No comments:
Post a Comment