का राहतो बाप्पा, थोडेच दिवस, अन् का करावं त्याचं विसर्जन....
एखाद्याच्या येण्याची उत्सुकता, वास्तव्याची मौज,
जातानाची हुरहुर,आणि पुन्हा येण्याबद्दलची आण
हे सारं, शिकवून जातं आपल्याला आयुष्याचं तत्वज्ञान !
सुख असलं 'अल्पायुषी' तरी, करावं साजरं, छान..
आणि पुढे पुढे उलटतच रहावं, आयुष्याचं पान....!
✍ सुजाता

No comments:
Post a Comment