connect होता आलं पाहिजे,.....
निसर्गाशी,..... फुलांच्या हळूवार स्पर्शाशी,
वाऱ्यावरून येणाऱ्या धुंद गंधाशी,
उगवत्या सूर्याच्या कोवळ्या किरणांशी
अन् हो, कोसळणाऱ्या जलधारांशी...!
Connect होता आलं पाहिजे,
भुकेजलेल्या भिकाऱ्याशी,
गरीब पण स्वाभिमानी विद्यार्थ्याशी,
आणि दुखावलेल्या एकाकी स्त्रीशीही...
Connect होता आलं पाहिजे,
एखाद्या जखमी जनावराशी सुद्धा...
तरच Connect होऊ आपण,
त्या सर्वशक्तिमान जगन्नियंत्याशी....!
✍️ सुजाता

No comments:
Post a Comment