भाळीची जखम भळाळती राहण्याचा
अश्वत्थाम्याला शाप असतो,.....
पण आपण का उगीचच
जुनी दु:खं सांभाळून ठेवतो ?
२० वर्षांपूर्वी झालेले अपमान, शल्य
कुरवाळत बसतो....?
का, भूतकाळाला, वर्तमानातली जागा अडवू देतो....?
वर्तमान काळाला जो खरंच "Present" मानतो,
टोचणाऱ्या आठवणी जो मनातून काढून टाकतो,
तोच खरंतर मुक्त, आनंदी जीवन जगतो !!
✍️ सुजाता.

No comments:
Post a Comment